मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

Wining Asia Pacific HR Leadership Award 2014....

Asia Pacific HRM Congress 2014....

I was at Asia Pacific HRM Congress 2014 on 11th Sept 2014. It was a great pleasure to be there and interact with CEOs and top HR leaders across industries, Indian and MNCs. I was one of the recipient of  “Asia Pacific HRM Leadership Award”. had received the mail from Congress somewhere in April that I was short-listed for this award by the research team of Congress. I was delighted and proud to be short-listed for such award and that at Asia Pacific level. I am always committed to the profession but before that I am passionate for what I do. I like to work on innovations in HR and build the team so that they excel in their career. I express my sincere thanks for selecting me for this award. This is really a great honour and I dedicate this to my family, team and my known, unknown mentors in my life.





 I also spoke in the congress in the session on “Creating Global Leaders.”  This session was chaired by Rajiv Noronha, (Head –OE, BPS-TCS). Rajeev has written well on his blog about the session. He writes, “First presentation by Vinod Bidwaik, HR Director at  DSM India Pvt Ltd,  brought out how leadership is key to securing the future for company which is driven by innovation.   The company had evolved  over a period of 110 years from a mining company to a high tech speciality plastics products company and also getting into some amazing innovations that will drive the growth.  To enable this you needed to shape the right behaviours right from entry  screening to retention and motivation and the right leadership was needed to provide that direction.   After all Leadership is a verb and not a noun.  It is all about driving momentum and bringing change and not about remaining good where you are.  The six stage model that was presented made an interesting learning from the companies five year journey.”



Please refer Rajiv blog, http://rnor.blogspot.nl/2014/09/discussions-on-creative-leadership-at.html for details and perspective of other speakers, Wing Commander Naresh Taneja Head HR for IRB Infrastructure Services and also Rajiv.

रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं?

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं? - असं मुलाखत घेणा:यानं विचारलं तर तुम्ही काय सांगता, बढाचढाके बोलता की सेण्टी मारता?


व्हॉट इज युवर फॅमिली बॅकग्राऊण्ड? - तुङया कुटुंबीयांबद्दल मला काहीतरी सांग. हा प्रश्न मुलाखत घेताना प्रत्येकाला विचारला जातो.

अनेकांना वाटतं, कुटुंबाचा आणि  जॉब सिलेक्शनचा काही संबंध आहे का? असले प्रश्न कशाला उगीच विचारतात. खरंय त्यांचं अजून तरी हा असा प्रश्न विचारणं भारतात तसं चुकीचं मानलं जात नाही. पण अमेरिकेत किंवा युरोपीयन देशांमध्ये मात्र हा प्रश्न मुलाखतीत विचारता येत नाही. जर फॅमिली बॅकग्राऊण्डवरून उमेदवाराला  जॉब नाकारला आहे असं वाटलं तर उमेदवार त्या मुलाखत घेणा:या व्यक्तीच्या आणि कंपनीच्या विरुद्ध डिसक्रिमिनेश केलं म्हणून कोर्टात जाऊ शकतो.

मुलाखत घेणा:यांच्या सुदैवाने आणि उमेदवाराच्या दुर्दैवाने भारतात मात्र आजही या प्रश्नाला खूप महत्त्व आहे. उमेदवाराची जडणघडण (विचारांची) त्याच्या व्यक्तिमत्त्वामागील प्रभावी घटना कोणत्या आहेत, हे जाणून घेण्याचा येथे हेतू असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपल्या पालकांचा, घरातील मोठय़ा व्यक्तींचा शाळेतील वातावरणाचा आणि समाजातील घटकांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर आपण खूप लाईटली दिलं तर मात्र मुलाखतकर्ता वेगळा विचार करू शकतो. खरंतर या प्रश्नाचं उत्तर लाईटली देऊ नये आणि उगीच कौटुंबिक मेलोड्रामाही सांगत बसू नये.

जरा तारतम्यानं स्वत:विषयीची माहिती मात्र देता यायला हवीच. 

श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब बॅकग्राऊण्ड हे कधीही जॉब सिलेक्शनसाठी महत्त्वाचे घटक ठरू शकत नाही. पण ते घटक तुमच्या अॅटिटय़ूडमध्येही  दिसायला नको. तुम्ही श्रीमंत आहात आणि म्हणून तुम्हाला मिळालेल्या जॉबची काही किंमतच वाटणार नाही, काही गरज नाही तुम्हाला नोकरीची असं मुलाखतकत्र्याला वाटायला नको. किंवा तुम्ही खूप गरीब आहात, त्यामुळे मुलाखत घेणा:याला तुमच्याविषयी सहानुभूतीही वाटायला नको. 

इथेच तुमचा अॅटिटय़ूड महत्त्वाचा ठरतो. ब:याचदा मुलं कर्ज करून शिक्षण घेतात आणि मुलाखतीच्या वेळेस या कर्जाचा बाऊ करतात, कर्ज घेऊन शिक्षण घेतलं असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रय} करतात.
पण तसं सांगायची काही गरज नाही, म्हणजे सांगितलं तरी त्याचं भांडवल करू नका, मुलाखत घेणारा म्हणालाच की तुमचे पर्सनल प्रॉब्लम हा तुमचा प्रश्न आहे, कंपनी काही करू शकत नाही, तर कसं वाटेल तुम्हाला?

त्यामुळे तुमच्या परिस्थितीचा वेगळा विचार करा. तुमच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीचाही अभिमान बाळगा आणि जे आहे ते योग्य प्रकारे सांगा. तुमच्या बॅकग्राऊण्डमुळे तुम्ही काय शिकलात, घरातील लोक कसे सपोर्टिव्ह आहेत, जॉबसाठी आवश्यक असणारे गुण तुम्ही घरीच कसे शिकलात हे सांगितलं तर बरं होईल.
उदा. माङया वडिलांनी खूप कष्टानं आम्हाला शिकवलं, मला आणि भावंडांना कशाचीही कमी पडू दिली नाही म्हणून आम्ही आज हे शिक्षण घेऊ शकलो. माङया वडिलांचा सकारात्मक गुण आणि जिद्द माङयातही आहे. असं सांगितलं तर तुमच्याविषयी मुलाखतकत्र्याचंही योग्य मत तयार होऊ शकेल. बढाचढाके बोलू नका, पण योग्य माहिती, योग्य शब्दात देण्याची सवय लावा.

(लोकमत ११ जुलै २०१४) 

मंगळवार, २ सप्टेंबर, २०१४

सांगकाम्यांना नो एण्ट्री

काम दिसतं तुम्हाला? कुणी कामच सांगितलं नाही म्हणून तुम्ही काहीच करत नाही?

इनिशिएटिव्ह हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा.

‘तू स्वत: काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत का?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. हे इनिशिएटिव्ह कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये, कुटुंबामध्ये कोठेही असू शकतात. या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवाराकडून काढलं जातं. मुळात विद्यार्थी उमेदवार हा इनिशिएटिव्ह घेणारा असला की, संस्थेची बरीचशी कामं सोपी होतात. मराठीमध्ये या शब्दाला फार तर आपण ‘पुढाकार’ म्हणू शकू. परंतु या शब्दाचा अर्थ निव्वळ पुढाकार नव्हे.

एखादी घटना योग्य पद्धतीनं विश्लेषित करून, दुसर्‍यांची वाट न बघता, स्वतंत्रपणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या प्रवृत्तीला/गुणाला आपण ‘इनिशिएटिव्ह’ म्हणू शकतो. कर्मचार्‍यांचा हाच गुण महत्त्वाचा ठरतो. आताच्या आधुनिक कार्यपद्धतीमध्ये ‘सांगकाम्या’ कर्मचारी कोणालाच नको असतो. कामाच्या जागी बर्‍यापैकी गुंतागुंत असते. बर्‍याचदा स्वत:ला काही निर्णय घ्यावे लागतात. अशावेळेस इनिशिएटिव्ह घेऊन एखादी सिस्टिम डेव्हलप करणारा, सुधारणा करणारा उमेदवार केव्हाही सरस ठरतो.

एखादी कृती करण्याची गरज असताना, ती कृती दुसर्‍यांकडून अपेक्षित करणं केव्हाही चुकीचं आहे. उदा. आपण आताच्या राजकीय परिस्थितीबद्दल खूपदा चर्चा करतो, परंतु ही राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. साधं मतदार यादीत नाव नसेल तर मतदार यादीत नाव घालण्यासाठी प्रयत्नही करत नाही. एका कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला जेव्हा वाटलं की, आपण काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा त्यानं समविचारी मित्रांना एकत्र आणून आपल्या भागामध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला. हे त्याला कोणी सांगितलं नाही, पण त्याच्या मनातून काहीतरी करण्याची भावना होती. बर्‍याचदा आपण एखाद्याला फॉलो करतो, परंतु गरज असेल तेव्हा बदलासाठी इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक ठरतं.
असे तुमचे इनिशिएटिव्ह तुम्ही सांगू शकला, तर तुमच्यात काहीतरी खास दम आहे. पण आपल्या स्वभावात इनिशिएटिव्ह घेणं आहे हे कसं ओळखाल? हा तुमच्यातला गुण मुलाखतकर्ते कसं ओळखतात? तर अगदी साध्या साध्या उदाहरणातून आणि अनुभवातून. तुम्ही विद्यार्थी असाल तर कॉलेजमध्ये काय इनिशिएटिव्ह घेताहात. कर्मचारी असाल तर संस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय करताहात हे सर्व योग्य पद्धतीनं सांगता यायला हवं.


जेव्हा मी फ्रेशर्सच्या इंटरव्ह्यूज घेतो, तेव्हा फक्त २0 टक्के विद्यार्थीच असं काहीतरी वेगळं सांगू शकतात. बाकीचे ८0 टक्के गप्प बसतात नाहीतर ओढूनताणून काहीतरी सांगतात. इनिशिएट करायचं म्हणजे काय करायचं हे ठरवायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडलाच असेल तर त्याचं उत्तर सोपं. सोसायटीच्या गणपती उत्सवात तुम्ही किती भाग घेतलाय?
सुरुवात तिथूनही करता येतेच.

(लोकमत २१ मार्च २०१४)