Interview Questions लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Interview Questions लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ मार्च, २०१५

Time Management & Priority Setting: फ्री टाइमचं काय करता? - ते काय असतं?



भ्यासाव्यतिरिक्त तू काय करतोस? म्हणजे अभ्यास नसेल तेव्हा काय करतोस? फुरसतीचा वेळ कसा घालवतोस? 

-असे प्रश्न तीन महिन्यांपूर्वी एका इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारले.
रिकाम्या वेळेत मी माझ्या गर्लफ्रेण्डसोबत असतो. असं त्याचं डिरेक्ट उत्तर होतं. त्याला सरळ रिजेक्ट करण्यात आलं. अभ्यास  नसेल, तेव्हा मैत्रिणीसोबत घालवत असतो हे त्याचं उत्तरही प्रामाणिक असेल, त्यानं ते देण्यात डेअरिंगही असेल. पण या एका उत्तरावरून व्यक्तिमत्त्वाची चुणूक दिसून येते. ज्या वयात करिअरवर लक्ष देण्याची गरज आहे, त्या वयात सगळा वेळ असा घुमण्या फिरण्यात घालवून कसं चालेल?

प्रेमाता पडणं, गर्लफ्रेण्ड असणं, तिला वेळ देणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण सगळा वेळ ‘असाच’ जातो, आपल्या हाती असलेल्या वेळातून प्रॉडक्टिव्ह असं काहीच घडत नाही, वेळेचं योग्य नियोजन करता येत नाही हे चूक आहे.

what do you do when you have free/leisure time?

हा प्रश्न मुलाखतीत तसा हमखास येतोच. या उत्तरातूनही तुमच्या व्यक्तिमत्तवाचे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही सहज जरा स्वत:ला प्रश्न विचारा की, फुरसतीच्या वेळेत तुम्ही काय करु शकता? काय करता?

 तुमचे छंद जोपासू शकता का? वाचन करता का? चार लोकांमध्ये जाऊन एखाद्या प्रोजेक्टवर काम करू शकता, ट्रेकिंगला जाऊ शकता, गर्लफ्रेण्डसोबत जायलाही हरकत नाही, ग्रूपबरोबर आउटिंगही करु शकता आता या सर्व activities तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कामासोबत लिंक करता ते महत्त्वाचं ठरतं.

तुमचे छंद तुम्ही जोपासत असाल तर तुमचा स्ट्रेस कमी करायला ते मदत करतात. भरतनाट्यम केल्याने तुमचे कॉन्संट्रेशन वाढते, गाण्याच्या रियाजाने तुमचा आवाज साफ होतो. तुम्ही छान रमता एका वेगळ्या जगात, तुम्ही ट्रेकिंग करत असाल, तर तुमची रिस्क टेकिंग अँबिलिटी लक्षात येते.

पण जेव्हा असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार, याचा विचार करा! काहीतरी इंटरेस्टिंग तुम्ही करू शकताच. फेसबुक / व्हॉट्स अँप वर असणं, पार्टी करणं, खूप टीव्ही बघणं हे इंटरेस्टिंग असू शकतं. परंतु तुमचा वेळ तुम्ही नेमका कसा घालवला याचं उत्तर व्हच्यरुअल प्रेझेन्स असू शकत नाही ना?  तो वेळ का वापरला तिथं याची काही पॉझिटिव्ह साईड सांगता मात्र यायला हवी.

भारतातील व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी आजवर घेतल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बायोटेडामध्ये छंद म्हणजेच हॉबी हा कॉलम हा प्रकर्षाने लिहिलेला असतो आणि निव्वळ लिहिलेला नसतो, तर काही विद्यार्थी ते मनापासून जोपासतात. या सर्वांचा फायदा त्यांना त्याच्या त्यांचा आत्मविश्वास दुणावण्यात होतोच असतो.

दुर्दैवाने महाराष्ट्रातील काही महाविद्यालयातली मुलं पुस्तकंही वाचत नाही. वर्तमानपत्रही रोज वाचत नाहीत.

ते काय उत्तर देणार, या अशा ट्रिकी प्रश्नांचं?

तेव्हा तुम्ही ठरवा, फुरसतीच्या वेळाचं तुम्ही काय करता?

रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं?

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं? - असं मुलाखत घेणा:यानं विचारलं तर तुम्ही काय सांगता, बढाचढाके बोलता की सेण्टी मारता?


व्हॉट इज युवर फॅमिली बॅकग्राऊण्ड? - तुङया कुटुंबीयांबद्दल मला काहीतरी सांग. हा प्रश्न मुलाखत घेताना प्रत्येकाला विचारला जातो.

अनेकांना वाटतं, कुटुंबाचा आणि  जॉब सिलेक्शनचा काही संबंध आहे का? असले प्रश्न कशाला उगीच विचारतात. खरंय त्यांचं अजून तरी हा असा प्रश्न विचारणं भारतात तसं चुकीचं मानलं जात नाही. पण अमेरिकेत किंवा युरोपीयन देशांमध्ये मात्र हा प्रश्न मुलाखतीत विचारता येत नाही. जर फॅमिली बॅकग्राऊण्डवरून उमेदवाराला  जॉब नाकारला आहे असं वाटलं तर उमेदवार त्या मुलाखत घेणा:या व्यक्तीच्या आणि कंपनीच्या विरुद्ध डिसक्रिमिनेश केलं म्हणून कोर्टात जाऊ शकतो.

मुलाखत घेणा:यांच्या सुदैवाने आणि उमेदवाराच्या दुर्दैवाने भारतात मात्र आजही या प्रश्नाला खूप महत्त्व आहे. उमेदवाराची जडणघडण (विचारांची) त्याच्या व्यक्तिमत्त्वामागील प्रभावी घटना कोणत्या आहेत, हे जाणून घेण्याचा येथे हेतू असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपल्या पालकांचा, घरातील मोठय़ा व्यक्तींचा शाळेतील वातावरणाचा आणि समाजातील घटकांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर आपण खूप लाईटली दिलं तर मात्र मुलाखतकर्ता वेगळा विचार करू शकतो. खरंतर या प्रश्नाचं उत्तर लाईटली देऊ नये आणि उगीच कौटुंबिक मेलोड्रामाही सांगत बसू नये.

जरा तारतम्यानं स्वत:विषयीची माहिती मात्र देता यायला हवीच. 

श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब बॅकग्राऊण्ड हे कधीही जॉब सिलेक्शनसाठी महत्त्वाचे घटक ठरू शकत नाही. पण ते घटक तुमच्या अॅटिटय़ूडमध्येही  दिसायला नको. तुम्ही श्रीमंत आहात आणि म्हणून तुम्हाला मिळालेल्या जॉबची काही किंमतच वाटणार नाही, काही गरज नाही तुम्हाला नोकरीची असं मुलाखतकत्र्याला वाटायला नको. किंवा तुम्ही खूप गरीब आहात, त्यामुळे मुलाखत घेणा:याला तुमच्याविषयी सहानुभूतीही वाटायला नको. 

इथेच तुमचा अॅटिटय़ूड महत्त्वाचा ठरतो. ब:याचदा मुलं कर्ज करून शिक्षण घेतात आणि मुलाखतीच्या वेळेस या कर्जाचा बाऊ करतात, कर्ज घेऊन शिक्षण घेतलं असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रय} करतात.
पण तसं सांगायची काही गरज नाही, म्हणजे सांगितलं तरी त्याचं भांडवल करू नका, मुलाखत घेणारा म्हणालाच की तुमचे पर्सनल प्रॉब्लम हा तुमचा प्रश्न आहे, कंपनी काही करू शकत नाही, तर कसं वाटेल तुम्हाला?

त्यामुळे तुमच्या परिस्थितीचा वेगळा विचार करा. तुमच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीचाही अभिमान बाळगा आणि जे आहे ते योग्य प्रकारे सांगा. तुमच्या बॅकग्राऊण्डमुळे तुम्ही काय शिकलात, घरातील लोक कसे सपोर्टिव्ह आहेत, जॉबसाठी आवश्यक असणारे गुण तुम्ही घरीच कसे शिकलात हे सांगितलं तर बरं होईल.
उदा. माङया वडिलांनी खूप कष्टानं आम्हाला शिकवलं, मला आणि भावंडांना कशाचीही कमी पडू दिली नाही म्हणून आम्ही आज हे शिक्षण घेऊ शकलो. माङया वडिलांचा सकारात्मक गुण आणि जिद्द माङयातही आहे. असं सांगितलं तर तुमच्याविषयी मुलाखतकत्र्याचंही योग्य मत तयार होऊ शकेल. बढाचढाके बोलू नका, पण योग्य माहिती, योग्य शब्दात देण्याची सवय लावा.

(लोकमत ११ जुलै २०१४) 

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

नेटवर्किंग- तुमचे मित्र कुठे जॉब करतात?

नेटवर्किंग पाहिजे यार असं म्हणता तुम्ही, पण आहे तुमचा कॉलेजातल्या सिनिअर्सशी संपर्क? ते देतील कुणाला तुमचा रेफरन्स?

ओळखीशिवाय काम होत नाही. आमच्या ओळखी नाहीत म्हणून आम्हाला जॉब मिळत नाहीत, अशासारखी कारणं बर्‍याचदा दिली जातात.

खासगी क्षेत्रात हे खरं आहे का? ओळख म्हणजेच वशिला असं सांगण्याचा हा प्रयत्न असतो. परंतु निव्वळ ओळखीमुळे प्रोफेशनल कंपनीमध्ये जॉब मिळत नाही. तुमची ओळख आहे. परंतु आवश्यक स्कीलसेट नसेल, तर तुमची नियुक्ती होईल याची काहीच गॅरंटी नाही.

कंपन्या एखाद्या पोझिशनसाठी जेव्हा निवड प्रक्रिया राबवतात, त्यामागे एक लॉजिकल प्रोसेस असते. रेझ्युमे मागवताना, शोधताना वेगवेगळी माध्यमं वापरली जातात. रेफरन्स अथवा ओळख हा त्यापैकी एक सोर्स असतो. तुमचा सीव्ही/रिझ्यूम निवड प्रक्रियेत सामावला जाऊन तुम्हाला मुलाखतीचा कॉल येण्याची संधी मात्र ओळखीतून मिळू शकते. मुळात आपल्याला कर्मचार्‍याच्या माहितीतला, संपर्कातला गुणी माणूस कंपनीत रेफर करणं यात काही वावगं नाही, किंवा तसं केलंही जातं. ओळख फक्त मुलाखतीचं आमंत्रण देण्यापुरती, योग्य माणूस शोधण्यापुरती ही एक खिडकी असते. सांगायचा मुद्दा एवढाच की, कॉलेजमध्ये असताना आपण आपल्या किती सिनिअर्सच्या संपर्कात असतो, तुमचे सिनिअर्स कोठेतरी नोकरी करत असतील तर ते तुमचा रेफरन्स ‘रेफरल प्रोग्रॅम’मध्ये देऊ शकतील. यालाच आजच्या आधुनिक जॉब मार्केटमध्ये नेटवर्किंग म्हणतात. हे नेटवर्किंग फक्त नोकरीच नव्हे तर जॉब मिळाल्यावर प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं.

एखादं काम करताना खूप लोकांची मदत आपल्याला घ्यावी लागते. आधुनिक कार्यसंस्कृतीमध्ये तुमच्या पॉवरपेक्षा (पदाने आलेली) तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत किती वेगाने ओळखी करता आणि त्या ओळखीचे एखाद्या संकल्पनेत, व्यवसायात अथवा कंपनीसाठी नव्या संधीमध्ये किती रूपांतर करू शकता, हे महत्त्वाचं ठरतं.

‘तुझे मित्र किती आहेत? तू तुझा वेळ मित्रांसोबत कसा घालवतो? अनोळखी व्यक्तिसोबत ओळख करून घ्यायला तुला आवडते का?’ यासारखे प्रश्न मुलाखतीच्या वेळेस विचारण्यामागे हेच कारण असतं. बर्‍याच मानसशास्त्रीय टेस्ट घेण्याचं कारणही हेच असतं.

त्यामुळे आजच्या जगात एकटं राहून चालणार नाही, स्वत:च्या कोशात जगून जॉब मिळणार नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तीसोबत नेटवर्किंग करता तेव्हा तुम्ही एक संधी तयार करत असता. तुमचे प्रोफेसर, सिनिअर्स प्रोजेक्टच्या वेळी संपर्कात आलेले वेगवेगळ्या कंपन्यातले, संस्थातले ऑफिसर्स, एखाद्या कार्यक्रमात भेटलेल्या व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतील. तुमचं नाव एखाद्या चांगल्या जॉबसाठी सजेस्ट करू शकतील. त्यामुळे ओळखी वाढवा, त्या जपा.

एक मात्र लक्षात ठेवा नेटवर्किंग एका बाजूने होत नाही. तुम्हाला शक्य असेल, तेव्हा तुम्हीही तुमच्या मित्रांना, ज्युनिअर्सना मदत करायला विसरू नका.

नेटवर्क जितकं मोठं, संधी तितक्या जास्त, हे लक्षात ठेवा.

(लोकमत, २१ फेब्रु २०१४)

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

कॉन्फिडन्स तो का नसतो? कुठून येतो?

श्रीरंग पडबिद्रीकर नावाचा उमेदवार माझ्यासमोर गोंधळून बसला आहे. बिचारा किंचित घाबरलेला, उगाचच. हाताची चाळवाचाळव आणि माझ्या केबिनमध्ये उगाचच चौफेर नजर फिरवतोय. त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करावं. या उद्देशानं मी श्रीरंगाला विचारलं, ‘काय श्रीरंग कसा आहेस?’ 

‘ठीक आहे सर’ तो. त्याला अजून कम्फर्टेबल बनवावं या उद्देशानं मी परत प्रश्न केला ‘का रे ठीक? चांगला नाहीस?’ तो कसानुसा हसला. म्हणाला, ‘बरा’.
मी हसलो. तोही हसला. 

‘तुझ्या या बायोडेटावर तुझी संपूर्ण माहिती आहे. चांगली आहे, पण तू जर तुझ्याबद्दल थोडी माहिती सांगितलीस तर बरं होईल.’ मी त्याला अजून कम्फर्टेबल करण्याच्या उद्देशानं विचारलं.

मुलाखत घेणारी व्यक्ती ही कोणत्या तरी परग्रहावरून आलेली असते आणि ती खूप दृष्ट असते, असा एक समज उमेदवारांमध्ये असतो. याच समजातून बिचारे मुलाखतीच्या आधीच स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. अर्थात, उमेदवाराला छळणारी मंडळीही असतात. पण आता तर अशा मुलाखतकर्त्याला ‘मुलाखती कशा घ्याव्यात’ याचं प्रशिक्षणही अनेक संस्था देत असतात.

माझा आजवरचा मुलाखती घेतानाचा अनुभव मात्र एकच सांगतो, जवळपास ६0-७0 टक्के मराठी मुलं ही मुलाखत देताना आत्मविश्वासाअभावी मागे पडतात. मुलाखत देताना जो आत्मविश्वास उमेदवारांमध्ये अपेक्षित असतो, तो न दाखवल्यामुळे पहिल्या काही सेकंदामध्ये स्वत:बद्दलचं निगेटिव्ह मत तयार करून बसतात.

मागच्या लेखात आपण ‘स्वत:बद्दल’च्या माहितीबद्दल वाचले असेलच. स्वत:विषयी काहीही सांगताना तुम्हाला विचार करावा लागतो. तो विचार झाला की जे आहे ते आत्मविश्वासानं सांगता यायला हवं. शहरातील मुलं, वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या हिंदी भाषिक मुलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आलेला असतो. हाच आत्मविश्वास मराठी मुलं, स्पेशली ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये कमी पडतो. माझंच उदाहरण सांगतो, मी पहिल्यांदा विदर्भातील एक छोट्या खेड्यातून नाशिकसारख्या शहरात अकरावीला प्रवेश घेतला. तेव्हा माझा आत्मविश्वास कधी कधी मला दगा देत असे. इंग्रजी माध्यमात शिकलेले, फाडफाड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी बघितले की, मी कोशात जायचो; पण जेव्हा माझ्यापेक्षा मठ्ठ मुलं पुढं जायला लागली, तेव्हा लक्षात आलं, काहीतरी गडबड आहे. मी कॉलेजमधील वेगवेगळे फोरम्स जॉईन केले. व्यक्तिमत्त्व विकासावर काम करणार्या एका जागतिक संघटनेत कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढू लागला.

आत्मविश्वास ही एका दिवसात वाढणारी गोष्ट नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा लागतो. आणि हा आत्मविश्वास जेव्हा तुम्ही स्वत:ला जगासमोर, समाजासमोर मुलाखतीमध्ये जेवढय़ा आत्मविश्वासाने तुम्ही सामोरे जाता, तेवढय़ा टक्क्याने तुमची सिलेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. मला खूपदा प्रश्न पडतो की, आपल्याकडे ज्या काही गुण/गोष्टी असतात त्याचा उपयोग आपल्याला करता यायला हवा, तो आपण का करत नाही? घाबरत, चाचपडत वागून तुम्ही पुढे येणार नाही.

श्रीरंग पडबिद्रीकरनं याचं आत्मविश्वासावर काम केलं. तो कमावला. पहिली मुलाखत त्याची फेल गेली, पण आता तो एका मल्टिनॅशनलमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून काम करतोय. तुमची संधीही तुम्हाला अशीच गवसू शकेल. 

(लोकमत, ३१ जाने २०१४ )

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

मुलाखत घेणारे अभ्यासापलीकडचे भलतेच प्रश्न का विचारतात?

एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो. एखादा उमेदवार निवडताना, त्याच्यात तुम्ही एच आरवाले काय बघता? या प्रश्नाचं उत्तर खूपदा परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती म्हणजे आम्ही कोणत्या जॉबसाठी उमेदवार बघतो आहोत इथपासून ती विशिष्ट व्यक्ती आमच्या कंपनी कल्चरमध्ये फिट होऊ शकेल का इथपर्यंत सर्व काही असू शकतं.

ज्या पदासाठी निवडायचं त्यासाठीच्या अपेक्षा तो उमेदवार पूर्ण करू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न मुलाखत घेणार्याच्या डोक्यात अग्रस्थानी असतो. उदाहरणार्थ, मला एखाद्या फॅक्टरीसाठी दहा-बारा कामगारांना व्यवस्थित मॅनेज करणारा शिफ्ट सुपरवायझर हवा असेल, तर मी त्या उमेदवारात काय बघेन? 

समजा, एखाद्या कॉलेजमधून मी विद्यार्थ्यांना सिलेक्ट करत असेन, तर मी त्याला डायरेक्ट सुपरवायझरची जबाबदारी देणार नाही, परंतु त्याच्यातली स्किल्स पाहून मला असं वाटू शकतं की, हा किंवा ही उमेदवार पुढे ‘सुपरवायझर’ म्हणून चांगला तयार होऊ शकेल. मग मुलाखत घेताना मी मार्क्स बघेन, शैक्षणिक रेकॉर्ड तपासेन पण त्याहीपेक्षा त्याचं व्यक्तिमत्त्व दहा-बारा कामगारांना मॅनेज करू शकेल, अशा पद्धतीने मी डेव्हलप करू शकेल का, तशी धडाडी त्याच्याकडे आहे का, शिकण्याची, माणसं सांभाळण्याची, गोड बोलून काम करून घ्यायची हातोटी आहे का हे सारं प्राधान्यानं तपासून पाहीन. नुस्ते मार्क चांगले असतील आणि हे सारं नसेल तर मला त्याचा काय उपयोग? म्हणून तर नोकरीसाठीच्या मुलाखतीत टेक्निकल ज्ञानापेक्षा अन्य प्रश्न जास्त विचारले जातात. अनेक मुलं तिथंच कमी पडतात. त्यांना कळतच नाही की अभ्यासापलीकडचे, भलतेच प्रश्न का विचारताहेत?? पण त्या उत्तरातूनच उमेदवारातला स्पार्क (चुणूक) दिसतो. आणि स्वत:तला स्पार्क, प्रगतीसाठी तो वापरण्यासाठी मेहनत, हे सारं ‘एम्प्लॉयबिलिटीत’ येतं. 

दरवर्षी जवळपास पाच लाखांच्या आसपास विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतात आणि मार्केटमध्ये जवळपास ८ ते १0 लाखांच्या आसपास नोकर्या तयार होत असतात, अशी एक आकडेवारी सांगते. तरीही आपल्यासमोर बेरोजगारांची संख्या वाढते आहे. हे सगळं बदलायचं असेल तर अर्थात सरकार, शैक्षणिक संस्था यांनी प्रयत्न करणं अपेक्षित असलं, तरी आपण स्वत:ही नव्या काळातली कौशल्यं शिकूनच घ्यायला हवीत. मागील आठवड्यात मला नुकत्याच बी.ई. झालेल्या एका विद्यार्थ्याची मेल आली. त्यानं बायोडाटा अँटॅच करून पाठवत लिहिलं होतं, "Dear Sir, PFA and do the needful." हे असं उद्धट वाक्य वाचून कुणीही सुज्ञ एचआरवला त्याला मुलाखतीलासुद्धा बोलावणार नाही. 

पण का? त्याविषयी पुढील भागात. 


(लोकमत, १७ जाने २०१४)